Dhananjay Munde | ‘स्व. गोपीनाथराव मुंडे’ योजनेचे रूप बदलले; शेतकऱ्यांना आता अधिक लाभ


Dhananjay Munde |  केंद्र आणि राज्य सरकार हे नेहमीच शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी शेतकरी हिताच्या योजना आणत असतात. दरम्यान, अशीच एक योजना राज्य सरकारने सुरू केली असून, राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

अपघाती शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी, यासाठी ‘स्व. गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा’ या योजनेचे ‘शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान’ या योजनेत रूपांतर करण्यात आले असून, यानंतर प्रथमच राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडेंच्या माध्यमातून या योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी २३ कोटी ३७ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. (Dhananjay Munde)

याआधी ही योजना ‘स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे अपघात विमा योजना’ या नावाने ओळखली जात होती. तर त्यावेळी या अंतर्गत विमा सुरक्षा म्हणून अपघातग्रस्त शेतकऱ्यांना उपचारासाठी किंवा त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांच्या कुटुंबीयांना काही आर्थिक मदत म्हणून एक ठराविक रक्कम दिली जात होती. परंतु आता या योजनेचे विमा योजनेतून सानुग्रह अनुदान योजनेत रूपांतरण करण्यात आली आहे.

Nashik News | नाशिकच्या शेतकऱ्यांसाठी ‘दुष्काळात तेरावा महिना’…

यास मंजूरी मिळण्याच्या काळात संबंधित अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना गेल्या काही दिवसांपूर्वीच तब्बल ४९ कोटी रुपये वितरीत करण्यात आले. त्यानंतर आता या योजनेचे रूपांतर झाल्यापासूनच्या काळातील सर्व प्रलंबित प्रकरणे निकाली लावून लाभार्थी शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना रक्कम देण्यासाठी २३ कोटी ३७ लाख इतका निधीही उपलब्ध करुन देण्यात आला आहे. 

Dhananjay Munde | जनता दरबारात निवेदन आले अन्…

या योजनेतील खंडित कालावधीत अपघातात मृत्यू पावलेल्या परभणीमधील एका शेतकऱ्याच्या कुटुंबियांनी गेल्या काही दिवसांपूर्वी परळी येथे धनंजय मुंडे यांच्या संपर्क कार्यालयात जनता दरबारात भेट घेऊन निधी अभावी लाभ मिळात नसल्याची तक्रार केली होती. यानंतर मुंडे यांनी सदर योजनेचा आढावा घेटला आणि खंडित कालावधीतील राज्यातील सर्व अपघातग्रस्त आणि अपघाती मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांना ४९ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. त्याचबरोबर या योजनेतील बदलांनुसार २३ कोटी रुपयांचे अनुदानही उपलब्ध करून देण्यात आले आहे.

Onion Disease | कांद्यावर ‘नेक रॉट’ रोगाचा प्रादुर्भाव! ‘नेक रॉट’ का आहे कांद्याच्या जीवाचा शत्रू?

कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा

तसेच यावेळी राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या अंतर्गत कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कामाकरिता दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्करांच्या मानधनात चार पटीने वाढ करण्यात आल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. कृषी क्षेत्रात अतिउल्लेखनीय काम करणाऱ्या शेतकऱ्यास अथवा कृषी संस्थेस राज्य सरकारच्या कृषी विभागामार्फत प्रत्येक वर्षी विविध पुरस्काराने सन्मानित केले जाते. यानुसार आज कृषी पुरस्कारांच्या रकमेत चार पटीने वाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या पुरस्कारांची संख्या तसेच पुरस्कार्थीचे मानधन देखील वाढविण्यात आले आहे.(Dhananjay Munde)